पाऊस कोसळायला लागला की सिंधुदुर्गातील कड्याकपा-यातून अवखळ
धबधबे धावू लागतात. आंबोलीचा धबधबा, नांगरतासचा धबधबा, नापणे, मुटाट, मणचे,
मांगेली, असनिये हे ज्ञात आणि डोंगरभागातून अजून कितीतरी अज्ञात
धबधबे पावसाळयात उतू-मातू जात असतात. स्थानिक वृत्तपत्रे फोटोसहित हे धबधबे
निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवत असतात. त्याबद्दल खरोखरंच त्यांच कौतुक करायला हवं. कारण
डोंगरद-यात जाऊन कडयावरून कोसळणारे, फेसाळणारे हे धबधबे पाहणे आणि त्याखाली आंघोळ
करणे म्हणजे स्वर्गीय आनंद म्हणजे नेमके काय हे अनुभवण्यासारखंच असतं. पण हा
अनुभव एकटया-दुकटयाने घेण्यात मजा नाही. त्यासाठी हवा मित्र-
मैत्रिणींचा ग्रुप.
आणी आपल्यामधे हवी भटकंतीची ओढ.....
कोकण फिरायचा तर फक्त पावसातच...
Monday, 31 August 2015
धबधबा एकावर एक फ्री....
Labels:
SundarKoakn
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment